हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर   

पाटणा : जम्मू-काश्मीरच्या आर.एस. पुरा परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात  असलेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक महमह इम्तियाज यांचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर झाले. भारताने पाकिस्तानला असे उत्तर दिले पाहिजे की, त्याचा नकाशा जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया इम्तियाज यांचे भाऊ इमरान यांनी व्यक्त केली.
 
इम्तियाज यांचे पार्थिव काल पाटणा विमानतळावर  पोहोचले. विमानतळावर सुरक्षा कर्मचार्‍यांनी गार्ड ऑफ ऑनर आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर पार्थिव इम्तियाज यांचे पार्थिव सारण जिल्ह्यातील नारायणपूर गावात त्याच्या घरी नेण्यात आले. इम्तियाज यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) राजकीय सन्मनाने अंतिम संस्कार केले जाणार आहेत. पाटणाच्या विमानतळावर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल, अनेक मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
इम्तियाज यांचा मुलगा इम्रान रझा याने १० मे रोजी पहाटे ५.३० वाजता माझे त्यांच्याशी अखेरचे बोलणे झाले. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. त्यांने देशासाठी आपले प्राण अर्पण केले, असे सांगितले. भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पाहिजे, असेही तो म्हणाला. जेणेकरुन, कोणत्याही मुलास आपल्या वडिलांना गमवावे लागणार नाही, असेही त्याने सांगितले.
 

Related Articles